पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चला शिकूया जगण्याची कला

          ।। चला, शिकु या जगण्याची कला। (1)        मानव आपल्या संपूर्ण आयुष्यात सुखाचीच अपेक्षा करतो व सुखाच्या पाठी मागे धाव धाव धावतो. कधी कधी त्याची दमछाक होते हे सुख तो भौतिक वस्तुतच शोधत बसतो. गाडी, बंगला, पैसा ,पद ,प्रतिष्ठा यासारख्या वस्तूत.. गोष्टीत तो सुख शोधत असतो.वैभवात लोळणाऱ्या माणसाला जरी विचारलं तरी तो म्हणेल,"वैभव आहे रे, पण मनाला शांतता नाही". एकूणच काय माणसाला हव असलेल सुख त्याला वस्तुत, वास्तूत मिळणारच नाही. ह्या बाह्य वस्तुत तो सुख शोधु लागतो.सुख अशा बाह्यवस्तुतुन मिळतच नसत.तर ते अंतकरणात बसलेल्या त्या परमेश्वराचे ध्यान करण्याने मिळते. अंतरीचे सुख हेच खरं असतं यावर ठाम राहणे यामुळेच सुख मिळत असतं.अंंतरिच सुखच खरं सुख असतं, हे माहीत असूनही "कळतं पण वळत नाही" या म्हणीप्रमाणे क्षणभर आपणास पुन्हा आपण सुखाच्या मागे धावत राहतो पण सुखाची संकल्पना आपण समजूनच घेत नाही. आपणास असल्याच्या सुखापेक्षा नसल्याचे दुःख जास्त होतं. आपणाकडे 99 रुपये असतात पण आपल्याला शंभर रुपयाची गरज असते आपल्याला rs.99 असल्याचं आनंद वाटत नाही एक रुपया नसल्य...

।। कोजगिरी पोर्णीमा एक चिंतन।।

इमेज
।।कोजागीरी पोर्णीमा एक चिंतन।।                        आज अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणून किंवा शरद पौर्णिमा म्हणून संपुर्ण भारतभर विविध पद्गतीने साजरी केली जाते. गुजरातमध्ये रास व गरबा खेळून 'शरद पुनम' नावाने साजरी केली जाते तर, मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा ही पूजा केली जाते.  हिमाचल प्रदेशात या निमित्ताने जत्रा भरते.राजस्थानी स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र नेसून चांदीचे दागिने घालतात.धार्मिक वृत्तीचे राजपूत या रात्री चंद्राची पूजा करून शेतकऱ्यांना शर्करायुक्त दूध देतात.हरियाणामध्ये आश्विन पौर्णिमेला दुधाची खीर बनवून ती रात्री चांदण्यात ठेवतात व सकाळी खातात.ओडिशामध्ये,शरद पौर्णिमेला 'कुमार पौर्णिमा' असे म्हणतात.या दिवशी गजलक्ष्मी देवीची पूजा करतात.या दिवशी देवीच्या जोडीने चंद्र आणि सूर्य यांचीही पूजा केली जाते.बंगाली लोक 'लोख्खी पुजो' असे म्हणतात.या दिवशीच्या लोख्खी पूजेमध्ये बंगाली लोक शहाळी वा ताजे नारळ वापरतात. नारळात साखर, दुध, तूप आणि सुकामेवा घालून केलेला विशेष गोड पदार्थ या दिवशी कमळात बसलेल्या लक्ष...

।।चला शिकु या,जगण्याची कला।। जगण्याची कला

__॥चला शिकूया, जगण्याची कला....॥ _                          या पृथ्वीतलावरील अथांग जनसागरात हजारो माणसे आज दुःखीकष्टी जीवन कंठत आहेत तर त्यातली काही माणसं आपलं जीवन सुखी व आनंदमय जीवन जगत असल्याचं आपणास दिसतं का बरे काही माणसं सुखी तर काही माणसं दु:खी असं का? प्रत्येक माणसाला सुख हव असत. मात्र कणभरही दु:ख नको असतं तुकोबांचा अभंग वाचनात आला ते म्हणतात," सुख पाहता जवापाडे,  दुःख पर्वताएवढे" सुखाचे आनंदाचे हजारो प्रसंग आले तरी चालतील पण जवळच्या दाण्याएवढी दुःख आपणास नको असतं आपणास गुलाब हवा असतो पण त्याचे काटे मात्र मनाला दुःख देतात. ज्यांना सुख हवअसतं. त्यांना दुःख सोसावंच लागतं. सोन्याचं सोने पण सिद्ध करण्यासाठी सोन्याला परिस्थितीच्या भट्टीत तापवून घ्यावं लागतं तेंंव्हाच सोन्याला चकाकी येते व त्याच सोनेपन सिद्ध होतं. ही वस्तुस्थिती जी माणसं स्वीकारतात तीच खऱ्या अर्थाने जगण्याची कला अवगत असलेली माणसं वाटतात. अशा माणसांचे जर बारकाईने निरीक्षण केले तर त्यांच्यातील विशेष गुण आपणास ठळकपणे दिसून येतात.   मग या विशेष ग...

॥जगण्याची कला॥_*--भाग-४-----------------------------🦅जगण्याची कला🦅 लेखभाग क्र (४) 🌴नैराश्य... —✍________ एखादी व्यक्ती वारंवार नैराश्याच्या खाईत पडत असेल,तर त्याची इच्छा आपला जीव केव्हाच सोडुन मोकळी होते.कारण त्याचा दृष्टिकोनच नकारात्मक असतो. पाहील तर दृष्टी सर्वांनाच असते पण दृष्टिकोन हा विकसित करावा लागतो.मग हा दृष्टिकोन कसा बरे विकसित करता येईल. सर्व सुविधा असतानाही आज लोक डिप्रशनची शिकार होत आहेत याच कारण आहे ऐकटेपण ब्रिटन सारख्या देशात तर ही गंभीर समस्या बनली आहे. ऐकट राहण परिस्थिनुरुप ठिक आहे जरी परिस्थिती असली तरी सवय मात्र बनायला नको. माझ्या बालपणी मी संयुक्त कुटुंबात वावरायचो माझी पाच भावंडव दोन मामा अस आमच पन्नास माणसांच कुटुंब आम्हि व मामा वेगळेही होतो एकत्रही अस होत सार काही मोठ्या कुटुंबात वावरायच कस? हे ठाउक होत. पण आज विभक्त कुटुंबामुळ आजी आजोबा,काका काकी आत्या मामा चुलत भाउ यांच्याशी रुणानुबंधांच नात होत.पण विभक्तपणामुळ अनेक समस्यांना तोंड द्याव लागतय.मुल पाळणाघरात किंवा मोलकरणीच्या संस्कारात अन आईवडील मात्र वद्वाश्रमात .पुढे त्याचीच पुनरावृत्ती घडते. ऐकटपण येतय त्यामुळच नैराश्य येत त्याच्या निराकरणासाठीच काय त्याच सुत्र असेल .... आपण अनेक मित्रांशी ,नातलगांशी अहंकारामुळ बोललो नाही. मी का बोलु? असा दोन्हीकडुन अहंकार असल्यामुळ बोलण खंडलय त्यामुळच नात्यातला प्रवाह खंडीत झालाय .प्रवाह थांबला तो पुन्हा सुरु करता येईल.बोललो तर मन मोकळ करता येईल.नैराश्य कमी होईल. सर्वात प्रथम आपण नैराश्याला आजार मानतच नाहीत. तो मानयलाच हवा. दोन आठवड्यापेक्षाही अधिक काळ सतत उदास वाटण ही एक समस्याच आहे. आवडणार्य्या कामामध्ये आनंद न वाटणे रोजची कामे करण्यातही निरुत्साह वाटणे,उर्जाशक्ति कमी वाटणे, झोपकमी/ अधीक होणे. सतत काळजी वाटणे अशा कारणांनी नैराश्य दिसत ही समस्या दुर होवु शकते. नैराश्य प्रतिबंधासाठी_ सकारात्मक विचारपद्भती,समुपदेशन व वेळेत तज्ञांकडुन उपचार करुन घेतल्यास दुर होवु शकते.धीराने अशा संकटाचा समस्यांच निराकरण होवु शकत. सकारात्मक दृष्टिकोन विकसीत होवु शकतो. या कथेतुन समजुन येईल_ एकदा एका बुटाच्या कंपनीने आफ्रिकेत आपला व्यवसाय वाढवण्याच ठरवल तेथे त्यासाठी आपले प्रतिनिधी दोन प्रतिनिधी पाठवले .दोघेही तेथे राहुन व प्रयत्न करुन आले.पहिल्याने आपल्या निवेदनात म्हटले,"तेथे आपला वेळ व गुंतवणुक करण म्हणजे निष्फळच तेथे अडाणी व रानटी लोक आहेत .बुटाची विक्री होण अवघडच नव्हे तर अशक्यप्रायच! दुसर्य्यानही आपल निवेदन केल," पहिला बोलला त्याचाच भाग होता. तेथे अडाणी व रानटी लोक आहेत पण त्याहुनही महत्वाच अन्य कुठली कंपणी तेथे पोचली नाही .तेथे वेळ व पैसा वाया जाईलहि पण भविष्यात जेव्हा लोकांना बुट घालावयाची सवय होईल तेव्हा ते आपलाच बुट वापरतील. यावर आपण योग्य तो निर्णय करावा. दोनही व्यक्तिंना परमेश्वरान दृष्टी दिलीय पण दोघांचा दृष्टिकोन मात्र निराळा. जीवनात आपला पाहण्याचा दृष्टिकोन हा निकोप असण गरजेच नव्हे तर अत्यावश्यकच ! आपल्याला वैयक्तिक,सामाजिक आयुष्यात सुखी व समाधानी व्हायच असेल तर आपला प्रत्येक गोष्टिकड पाहण्याचा दृष्टीकोन विचार,चिंतन आणि भावना ह्या सकारात्मकच असायला हव्यात कारण त्याच आपल्याला जीवनात यशस्वी ठरवतात. वैयक्तिक अथवा सामाजिक जीवनात आपल्याला प्रतिष्ठा मिळवुन देण्यात वा ती धुळीस मिळवण्यास याच कारणीभुत ठरतात. ज्या प्रकारचे विचार आपल्या मनात आणि मेंदुत निपजतात,आपली कार्यशैलीही त्या विचारांच्या प्रभावाखाली वावरते. उदाहरण द्यायच झाल तर आपल्या भोकर विचार विकास मंचाचेच देता येईल .मंचाकडे सेवेसाठी पैसे नव्हते तरीही मंचाने विकासापासुन कोसोदुर असलेल्या मंदेलवाड वस्तीत दिवाळी साजरी केली . ,या वषीॅ दिवाळी पहाट,स्वच्छताकमीॅचा सत्कार,मुकबधिरिंना मदत,पाणी फौंडेशन मध्ये समंदरवाडी,दिवशी,हडोळी येथे श्रमदानासाठी अनेक मदतीचे हात पूढे आले, नवा पैसाही जवळ नसताना आपण सकारात्मकतेने कामाला लागलो काम होत गेले. बाबा आमटेंच अमरगीत आठवत "शृंखला पायी असु दे मी गतीचे गीत गाई दू:ख उधळावयास आता आसवांना वेळ नाही." यासम आपण सेवाभावाने काम करत गेलो तर आपल्यातल नैराश्य चुटकेसरशी जाईल. बैठकीत स्वर्गरथाचा प्रस्ताव आला बत्तीस हजार रुपयेही सुमूहुर्तावर जमले व त्याच नियोजनही लागल.एकुणच कायतर सकारात्मक दृष्टिकोनाचाच भाग म्हणावा लागेल.सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे प्रत्येक घटनेकड सकारात्मकतेन पहाण..अनुभवण..वर्तनात आणन. सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे परीसच लोखंडाच सोन करणारा. तुकोबा म्हणतात_ "लोह परिसा रुसले सोनेपणाशी मुकले तेथे कुणाचे काय गेले ज्याचे त्याने अहित केले." आपल अहित व्हाव अस न वाटणार्य्यांनी सकारात्मक दृष्टीकोनरुपी परिसस्पर्श करुन घ्यावा व जीवनाच सोन कराव. (क्रमश:) भेटु पुढील भागात.कृपया यातील त्रुटी दर्शवाव्यात🙏🏿———————————————✒🌅चंदु चक्रवार स्वामी समर्थ समुपदेशन केंद्र भोकर.🌅 ————————————————————————————

जगण्याची कला भाग-३ ----------------------------------------------*(3)जगण्याची कला————————————— पहिल्या दोन भागात आपण नैराश्यासंबधी चर्चा केली.ते येत ते अवाजवी अपेक्षा केल्यान अनेक कूटुंबात अस पहायला मिळत मुलान आपण सांगेल तसच वागाव त्याला स्वतंत्र व्यक्तिमत्व असत हे आपण विसरुनच जातो व आपल्याच साच्यात व तालमित वागाव अस वाटु लागत त्याच लग्न झाल असेल तर मग विचारायलाच नको.एकीकड पत्नी अन दुसरीकड आईबाप या दोघांच्या कात्रीत दररोजच कापला जातोय बिचारा इकड आड अन तिकड विहीर अशी अवस्था बनते .ऐकाव तरी कुणाच? या अवस्थेत त्याला नैराश्यान घेरल जात .आईवडिलांना वाटत की मुलगा हाताबाहेर गेला .तर पत्नीला नंदीबैल वाटतो. काय कराव हेच सुचतच नसत. अशावेळी दोन्ही बाजुंनी एकत्र संवाद साधुन प्रश्न सोडवावा लागेल जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुची शोधुन पाहे! रामदास म्हणतात.खरच सुख हे आपल्या मानण्यावरच असत. प्रत्येकाच्या जीवनात ताणतणाव असतातच.त्यांच मुळ असत आपल्या पुर्ण न झालेल्या इच्छा! जीवनात आपल्या सर्वच इच्छा पुर्ण होतच नसतात.काहीवेळा जीवनात अपयश येत,समस्या येतात पण त्या प्रसंगाशी आपण कशी झुंज देतो यावर सुखसमाधान अवलंबुन असत. आपण सुखी व्हाव,अस प्रत्येकालाच वाटत त्यासाठीच तर सर्व आटापिटा असतो.म्हणुन सुखी जीवनाच्या अर्थाचाही विचार व्हावा लागेल.भरपुर पैसा!बंगला,गाडी ,प्रसिद्धी असुनही माणुस सुखी असतोच अस मात्र नाही .याविनाही माणुस सुखी असुही शकतो.शेवटी सुख हे माणण्यावर अवलंबुन असत त्यासाठी आपला दृष्टीकोन सकारात्मक असायला हवा. असाच एक कथा आठवते. ऐके ठिकाणी एक मंदिर बांधले जाणार होते.तीॅन मजुर उन्हात बसुन दगड फोडत होते.एका वाटसरुने त्यापैकी एकाला प्रश्न विचारला," आपण काय करित आहात?" तो मजुर वैतागुण म्हणाला," दिसत नाही दगड फोडतोय ते?" त्याने दुसर्य्याला प्रश्न केला,मजुर म्हणाला," काही विशेष नाही,रोजगाराचं काम करतोय," तो वैतागलेला नव्हता पण तितकाच आनंदीही नव्हता. तिसरा मजुर तोंडाने भजन गात होता.त्याला मध्येच थांबवुन वाटसरुने तोच प्रश्न केला,यावर तो मजुर कृतार्थतेने,,आनंदाने म्हणाला," अहो,मी प्रत्यक्ष परमेश्वरासाठी मंदिर उभारत आहे,किती भाग्यवान आहे मी! पहा,तीघही तेच करत होते पण फरक होता दृष्टिकोनात! आपण आपला दृष्टीकोन बदलायलाच हवा .नैराश्याचा त्याग करुन आनंदाचा स्विकार करायला हवा, (क्रमश:) पुढच्या भागापर्यत आपणही विचार करा. _______✒चंदु चक्रवार ———*——*————*———**———————————————*——__

।।सवेॅॅषाम हिताय..सवेॅॅषाम उद्वराय ही विचारज्योत मनामनात प्रज्वलित करणार भोकर विचार विकास मंंच..।। सर्वेशा बुद्ध राय ही विचार ज्योत मनामनात सजवीत करणार भोकर विचार विकास मंच

इमेज
।।सवेॅॅषाम हिताय.. सर्वेषाम उद्बराय" ही विचार ज्योत मनामनात प्रज्वलित करणार भोकर विचार विकास मंच.....।। शब्दसेवा...पुष्प पहीले...     संकल्प अगर मजबूत होतो ,     इच्छा मजबूत होती है ,     चुमती है कदम राहे।     स्वागत मंजिल करती है ।          या कवितेतील शब्दांतील संकल्प शक्तीसम, संंकल्पित असलेल  भोकर शहरातील "सर्वेषाम हिताय..  सर्वेश्याम उद्वराय.".. जनसेवेचा मजबूत संकल्प मनाशी जपतच; ब्रीदवाक्यास ध्येयवाक्य समजुन आचरणात आणत, सर्वांचे हित.. सर्वांचाच उद्धार  संघटनेच्या माध्यमाने कसा घडवता येईल ,यासाठी भोकर शहरातील काही सामाजिक दायित्व जपणारी, ब्रीदवाक्य हेच व्रत समजून ;व्रतस्थ माणसांचे संघटन तीन वर्षांपूर्वी डॉक्टर उत्तम जाधव यांच्या "सीतामाता हॉस्पिटल "मधील व्यापक बैठकीतील विचारमंथनातून जन्माला आले. विविध विषयांवर या बैठकीत मंंथन झाल.विचारमंंथनातुन" भले तरी देऊ, कासेची लंगोटी .नाठाळाच्या माथी हाणू कायद्याची काठी "       तुकोबांच्या अभंगातील एका शब्दात  नाठाळांच्या माथी हाणु कायद्य...

दै.देशोन्नतीच्या आत्मोन्नती पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख दि.२९ आॅॅगस्ट २००२ " या जगण्यावर शतदा प्रेम करावे"

इमेज

।।मनाचाही दसरा काढु या.... ।।

  ____॥ मनाचाही दसरा काढु  या....।।             घत नवरात्राच शक्ति अन भक्तिच जागरण चालु असतानाच घराघरात महिलांंचे हात पुजा,आरतीबरोबरच घर स्वच्छ व नीटनेटक करण्याकड वळु लागतात त्याला आपल्याकड"दसरा काढण "अस म्हणतात. दसरा काढण म्हणजे घर धुवनपुसुन काढणंं. घरातले अंंथरुण,पांंघरुणासह अगदी किचनमधील सामानाचे डब्बे आतुन बाहेरुन स्वच्छ केलीजातात.आतल्या वस्तुला उन देवुन त्यातल्या जाळ्या,अळ्यांंना काढुन फेकल जात.निरुपयोगी सामान भंंगारात टाकतात. वापरात न येणारी फाटकी कापड देवुन भांंडी घेतली जातात.कपाटातील जुनी पुस्तके ,रद्दि पेपर भंंगारवाल्याला विकली जातात .  स्वच्छ व नीटनेटक घर बनवण्याच स्वच्छताकार्य दसर्य्याच्या निमित्ताने केल जात.                              मनाचाहि दसरा काढता येवु शकतो का? जस घर       दसर्य्याच्या निमित्ताने घर स्वच्छ केल जात.तशीच मनाचीही स्वच्छता करता येईल का? कपाटंं,भिंंती,      घराचा कोपरा न कोपरा आपण  झाडुन पुसुन स्वच्छ...

जिंंकण ही एक घटना आहे,जेता असण ही मनोवृत्ती आहे.

मॅॅरेथानमद्धे शेकडो माणसे धावत असतात.ती वेगवेगळ्या उद्देशान सामील होतात.काहींंना आपली क्षमता आजमावुन पहावयाची असतेआणी त्याची अपेक्षा तो पुर्ण करुन घेतो.अनेकांंना आपल्या कामगिरीत सुधारणा करवून घ्यायची असते.तर अनेकांंनी प्रथमच मॅॅरेथाॅॅनमध्ये भाग घेतलेला असतो. त्यांंचा उद्देश फक्त धावणे एवढाच असतो या तीनही प्रकारच्या लोकांंची उद्देश जरी वेगवेगळी असली तरीही ती पुर्ण झालीच असतात.शर्यत जरी जिंंकली नसली तरीही आपआल्या उद्देशात ती सफलच होतात. माणसाने फक्त जिंंकण्याचेच उदिष्ट डोळ्यासमोर ठवले तर जिंंकण्यापासुन मिळणारे फायदे त्याला कदाचित मिळणारही नाहीत.जिंंकण्यापेक्षासुद्धा सन्मानान जिंंकण आणि सन्मानान हरण्यात कदचित तयारीचा अभाव दिसुन येईल परंंतु अप्रामाणिकपणे जिंंकण्यातत चारित्र्याचा अभाव दिसुन येतो.आपण काहीही गैर केलंं तरी ते उघडकीस येणार नाही हे माहीत असताना एखादा माणूस कसा वागेल, यावरुन त्याच्या चारित्र्याची खर कल्पना येते.स्वत:ची सचोटी,प्रामाणिकपणा याच्याशी तडजोड करन झटपट जिंंण्याचा मार्ग स्वीकारणे योग्य नसतच.तुम्ही कदाचीत यशस्वीही व्हाल पण वस्तुस्थिती माहीत असल्याने विजयाचा निखळ आनंंद कध...

दै,एकमत वृृतत्रात व्यक्तिमत्व विकास या विषयावरील लेख दि.९ आॅक्टोबर२०१६ स्वत:ला घडवा आणि फुलवा!

इमेज