पोस्ट्स

वारी समरसता रुजवणारी जीवनशाळा...

 🪔वारी;समरसता रुजवणारी जीवनशाळा *    🪔 ——————————————————————       वारी ही महाराष्ट्राची समृद्ग अशी हिंदू धर्मातली मनामनात समरसता,रुजवणारी सांस्कृतिक अन धामिॅक  परंपरा,ही महाराष्ट्राची ओळख,वारकरी संप्रदायातील वारीची परंपरा प्राचीन आहे. खुद्द संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या कित्येक वर्षे आधी वारीची परंपरा सुरु असल्याचे दाखले दिले जातात.केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून या वारीचे विराट स्वरूप पाहण्यासाठी भाविक-पर्यटक या काळात आवर्जून भेट देतात. अशा जगप्रसिद्ध वारीत आपण मनान सहभागी होवु या.         हिंदु प्रथा,परंपरा,विधी,चालीरीती यांना बुरसटलेले,अंधश्रद्गाळु ठरवण्यात ज्यांची हयात गेली.ना त्यांची बाष्फळ,एकांगी बडबड थांबली ना त्यांच्या बूद्गीभेदाला समाज बळी पडला .या दोनही प्रक्रीया चिरंतन अव्याहतपणे चालुच आहेत.याला कारण हिंदुतत्वज्ञानातली वैचारीक बैठक यामुळे अगदी अमेरीकेच्या संसदेतही दिवाळी साजरी होते आहे.'सवेॅपि सुखिन सन्तु..सवेॅ सन्तु निरामया..'आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे..असा विश्वात्मकतेचा संदेश देणारा वार...

|| नृसिंह जयंती ||

 ✍🏻 || नृसिंह जयंती || यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशायच च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥    जेव्हां जेव्हां धर्माला ग्लानि येऊन अधर्म बोकाळतो तेव्हां तेव्हां  अधर्म आचरणार्‍या दुष्टांचा नाश करून,धर्म आचरणार्‍या सज्जनांचं रक्षण करून अधर्माचा नाश व धर्माचं पुनःप्रस्थापन करण्यासाठी परमेश्वर युगानुरूप वारंवार अवतार धारण करतात.     अवतार  म्हणजे खाली उतरणे म्हणजेच वरून खाली येणे. अवतार हा शब्द दैवी शक्ती किंवा देवाच्या रूपांसाठी वापरला जातो,जे मानव किंवा इतर रूपात पृथ्वीवर येतात आणि ज्या उद्देशासाठी येतात तोपर्यंत ते येथेच राहतात. वेगवेगळ्या धर्मग्रंथांमध्ये,पुराणांमध्ये, ग्रंथांमध्ये अवतारांची संख्या वेगवेगळी आहे. आठ,दहा,सोळा आणि कधी कधी चोवीस अवतारांच्या कल्पना आहेत,विष्णूचे दहा अवतार अधिक लोकप्रिय आहेत.यापैकी कल्की अवतार, ज्याला दहावा अवतार म्हणतात,तो भविष्यात होणार आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम,राम,कृष्ण आणि बुद्ध असे नउअवतारांनी पृथ्वीवर...

जिगरबाज मराठा योद्घा.सुभेदार मल्हारराव होळकर

 ═════•*═════•❁❀❁•═════**═════•* 🪩*सुभेदार मल्हारराव होळकर*🪩 *═════•*═════•❁❀❁•═════**═════•** तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती,  पण अटकेपार झेंडे रोवण्याची धमक फक्त आणि फक्त मल्हाररावांच्या रक्तातच होती."     मल्हाररावांच्या गौरवार्थ एका कवीने आपली लेखणी झिजवली. कवितेतला एक अन एक शब्द मल्हाररावांच कर्तृत्व उलगडवतो.    आजकाल समता,सोशल इंजीनिअरींग,ओबीसी फॅक्टरच्या पोकळ वाफा सोडल्या जातात.स्वत:च स्वत:ला पुरोगिमित्वाचे स्वामित्व स्वत:च बहाल करत शब्दखेळ चालवतात.पेशवाई केवळ आणि केवळ अन्यायच झाला.ब्राम्हणवादाच्या नावाच भांडवल करत,अनेक चांगल्या घटनाही आपल्या स्वार्थाच्या भाकर्‍या भाजण्यासाठी दडपुन टाकताना दिसतात.या बुद्गिवंताच्या सुपिक मेंदुत समाजमनाच मनसंधारण करुन समाज जोडण्याऐवजी हे फुटिच्या बीजाचीच पेरणी करत,हेच विचारबीज रुजवतात की काय?अस वाटु लागत. त्यांना वाटत'पेराल तेच उगवत'तेचतेच पेरत जातात की काय?अशी धारणा बनत चालली आहे. खरा इतिहास कधी ना कधी तरी डोक वर काढतो.खर्‍याच खरपण कधी ना कधी उघड पडतच.पेशव्यांनी अनन्वित अत्याचार केले हे सांगताना त्यांनी सो...

।।आजी सोनियाचा दिनु ।।वासवी जन्मोत्सव.

 ✍🏻 ।।आजी सोनियाचा दिनु ।। आजी सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ॥१॥ दृढ विटे मन मुळीं । विराजीत वनमाळी ॥३॥ बरवा संत समागमु प्रगटला आत्मरामु ॥४॥ कृपासिंधु करुणा कर । आज वासवी जन्मोत्सव.. माता कन्यकेच्या कृपाशिर्वादाने संपन्न 'होण्याचा दिवस..आजचा दिवस सोन्याचा,अमृतमयी दिवस!जणु अमृताचा पाऊसच बरसला असे मला वाटते.कारण आज, आपणा सर्वांनाच माता कन्यकेच्या कृपाशिर्वादाचा साक्षात्कार  अंतरबाह्य सर्वव्यापी असेल.   या देवी सर्वभूतेषु विद्या रूपेण संस्थिता ..  नमस्तस्यै नमो नम:    मातेच्या सत्संगात आपणा सर्वातला आत्माराम हृदयामध्ये प्रगटणार दयेचा सागर असलेली माता भक्तावर कृपा करणारच आहे.अशा दयासागर मातेविषयी आज आपण थोड जाणुन घेवु या.      पेनुगोंडा येथे राजा कुसुमश्रेष्ठी यांच राज्य होते.त्यांची राणी कुसुमांबेला लग्नाला बरीच वर्ष झाली तरीही पुत्रसुख मिळाले नव्हते. राजा कूसुमश्रेष्ठी व  कुसुमांबा दोघेही चिंतित असायचे. असेच ऐकदा त्यांनी आपले गुरू भास्कराचार्यांशी मसलत केली. आपल्या वंशवेलीवर फुल उमलावे यासाठी उपाययोजना सांगा अशी विनवणी  केली...

देशाचे भाग्य बदलण्यासाठी मतदान कराच..

      भारताच्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या बलिदानातुन भारत स्वतंत्र झाला.स्वातंत्र्यवीरांनी आपल आयुष्य वेचल.स्वराज्य,स्वदेशी,स्वावलंबन बहीष्कार या चतु:सुत्रीने स्वातंत्र्य चळवळ टिळकांनी तळागाळापर्यत पोहचवली. सुभाषबाबुंनी आझाद हिंद सेना स्थापुन इंग्रजांना सळो की पळो केले.स्वातंत्र्यवीरांनी जन्मठेप भोगली.लक्षावधींनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. स्वराज्य आले,सुराज्य येण्यासाठी आपण आजही धडपडतो आहोत. पुर्णत: गरीबी आजही हटली नाही.सुजलाम सुफलाम देश अजूनही घडावयाचा आहे.चार ऋतु,सर्व प्रकारचे हवामान, मुबलक पाणी असे असताना आपण जगातील प्रगत राष्ट्र असायला हवे.सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्य झालो.त्यादरम्यानच जपान बेचिराख झाला होता. आपली व जपानची तुलना केली तर ते आज कुठे?आपण कुठे?या कारणांचा शोध घेतला तर आपली दरीद्री मानसिकता व मतदान  करण्याविषयीची मानसिकता हे उत्तर येत.                                         इमारत भक्कम करायची असेल तर तिचा पायाही...

🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩 🔆🚩🔆🚩🔆⭕ *सामाजिक समरसतेच समरसतेचे पालनपोषण करणारे भगवान श्रीराम*

 🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩🔆🚩 🔆🚩🔆🚩🔆⭕ *सामाजिक समरसतेच पोषण करणारे भगवान श्रीराम*  ⭕________________________________________________     अखील हिंदुच आराध्य दैवत असलेले भगवान श्रीराम यांचा आज जन्मदिन "रामनवमी"जगभर साजरी केली जाते.                                       "चंदन है इस देश की माटी तपोभुमी हर ग्राम है।                           हरबाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है...।।                                  आपल्यापैकी प्रत्येकालाच आपला मुलगा रामाप्रमाण असावा.एवढच नव्हेतर,भारतीयांच्या श्वासात श्वासात राम विराजमान आहेत.मरणानंतर निघालेल्या अंत्ययात्रेत राम नाम सत्य है'..."राम बोलो,राम..असा जयघोष केला जातो.एकुणच भगवान श्रीराम हा सनातन संस्कृतीचा आत्मा आहे आणि त्यांचे जीवन केवळ भारतभूमीत राहणाऱ्या हिंदुसाठी...

**रंगोत्सव मनामनांचा*

 🎋🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋🍃🍂 🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋             🟤*रंगोत्सव मनामनांचा*🟤 🍁🍂🍃🎋🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋🍃🍂 🍁🍃🍁🍂🍃🍂🍁🎋        आज होळीचा सण.हिंदु संस्कृतीत अनेक सणांची रेलचेल चालु असते.या आनंदाच्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहिली जात असते.असा हा  लोकोत्सव..                           काम क्रोध लोभाच्या रचूया गोवऱ्या     षडरिपू त्रिदोषाच्या अपेक्षा जाळू साऱ्या                                      ज्ञानाग्निने जाळून करुया राख       बीज द्वेषाचे निराशेचे करु खाक                 सुख शांती पूर्ण होवो..      समाधान,आनंदी आरोग्याच्या सर्वांना वारकरी संत अस म्हणतात, होळी हा लोकोत्सव. ऊत्तर भारतात होरी,महाराष्ट्रात होळी,शिमगा, कोकण, गोमंतकात शिग्मा,शिग्मो ह्या नावांनी तो प्रसिद्ध आहे. द...