वृृृृक्षारोपण काळाची गरज...
🌱🎍🌿🎍🌱🎍🌿🎍☘🎍🌱🎍☘🎍 🌱 वृक्षारोपण काळाची गरज🌱 _________________________________________________________________________ वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे।आळविती।। येणे सुख रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष। अंगी येत ।। निसर्गाशी समरस झालेले,निसर्गाशी नात सांगणारे,पशूपक्ष्यांशी सोयरीक जोडणारे संतकवी तुकोबा खरेखुरे पर्यावरणवादी होते.तुकोबांच्या काळात पर्यावरण हाशब्द प्रचलित नव्हताच.नव्हेतर,समाजव्यवस्था निसर्गाला अनूरुपच होती.तुकोबा देहुच्या डोंगरावरील झाडांशी व पशु पक्ष्यांशी एवढे समरस झालै की,त्यांनी त्यांना 'सोयरी' अस म्हटलय,कुटुंबीयांचा दर्जा वृक्षांना दिला.हा अभंग वृक्षांचे महत्व जनसामान्यांना समजावतो,तुकोबाच नव्हेतर,त्याही अगोदर माउलींनी ज्ञानेश्वरीतुन सत्षुरुषलक्षणे जनसामान्यांना उपदेशिली_ जो खांडावया घावो घाली। ...