।। समरस समाज मनामनात रुजवणारे..म.बसवेश्वर एक चिंतन..न...।।
🚩⚜🚩⚜🚩⚜🚩⚜🚩⚜🚩⚜ ✍🏻 ।। समरस समाज मनामनात रुजवणारे...महात्मा बसवेश्वर ...।।_____________________________________________ __________________________ "तुझे तेज अंगी शतांशे जरीही उजाळुनी देउ दिशा दाहि दाही... पुढे चालवु कार्य तुझे सदाही उजाळुनी देउ दिशा दाहि दाही..." या काव्यपुष्पासम,जगतज्योती महात्मा बसवेश्वर या महामानवाच्या जीवन कुंभातुन विचाररुपी तेजकण घेउन त्यांचा विचाररुपी वारसा पुढे चालवून दाही दिशा उजळुन टाकु शकतो.एवढ सामर्थ्य त्यांच्या जीवनचरित्रातुन मिळु शकत. आज आपल्या देशात परीवर्तनवाद,पुरोगामीचळवळ,स्रीमूक्ती ,मानवाधिकार,आंतरजातीय विवाह,लोकशाही शासन व्यवस्था या अशा अनेक विषयावर चर्चा करताना या सर्व सुधारणेच श्रेय पाश्चात्यांना सहज बहाल करतो.मध्ययुगात पाश्चात्यांना हा विषय माहीत होता का नाही?हाच संशोधनाचा विषय ठरेल .अशा बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी मनामनात रुजवतच चळवळ चालवली. आजचे तथाकथित बुद्विवादी आपल्या एकांगी विचारातुन आपल्या प्राचीन पुरातन संस्कृृृृृृतीला बुरसटलेली ठरवण्यात आपल आयुष्य खर्च करतआहेत. अशा या...