पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

,☬꧁*कोरोनाला आकषिॅत करु नका तर,मनाची मशागत करत कोरोनाशी लढतच, जगण्यावर .. जगण्यावर प्रेम करायला शिकु या

 *.. ࿇══━━━━✥◈✥━━  ࿇ * *.. ࿇══━━━━✥ कोरोनाला आकषिॅत करु नका तर,मनाची मशागत करत कोरोनाशी लढतच, जन्मावर ..जगण्यावर प्रेम करायला शिकु या..  * ꧂☬ ࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇*http://chanduchakrawar.blogspot.com/2020/05/blog-post.html?m=1 कोरोनाला आकषिॅत करु नका तर, मनाची मशागत करत कोरोनाशी लढा..(भाग१व२) ࿇══━━━━✥◈✥━━  ࿇ * *.. ࿇══━━━━✥    या विषयावर गतवषीॅ मे महीन्यात दोन लेख लिहले होते.मला वाटल.या विषयावर पुन्हा लिहावच लागणार नाही.कारण कोरोना संपत चालला असुन जनजीवन सुरळीत होत आहे.अस वाटतानाच पुन्हा यावषीॅ मार्चपासुनच कोरोना महामारीन पुन्हा डोक वर काढल असुन गतवषॅपेक्षाही यावषीॅचा कोरोना भयानक वाटतोय. जवळपासची अनेक लोक आपल्यातुन निघुन गेल्याचे आपल्या ऐकण्यात,श्रद्गांजली संदेशाद्गारे वाचावयास मिळताहेत.सोशल मिडीया उघडला की,निधन वार्ता,भावपुर्ण श्रध्दांजलीची पोस्ट वाचायला मिळतात.इतर पोस्ट टाकायला सुध्दा हिम्मत सुद्धा होत नाही.अशी खुपच जवळची माणसं  आपल्याला सोडुन इहलोकाच्या यात्रेला अचानक निघुन गेली आहेत.हे सांगतानाही उर भरुन येतो.माझे तर जवळचे तीनचार नातलग व अनेक मित्र व ...

🚩▬▬▬▬▬🚩🔹ஜ۩۞۩ஜ🔹▬▬▬🚩▬▬▬🚩            "तव तेजातील एक किरण दे.." शिवरायांच्या स्मृतीदिनानिमित्य विचाररुपाने अभिवादन..! .. ▬▬▬▬▬▬▬▬🚩 ஜ۩۞۩ஜ ▬▬🚩▬▬▬▬▬🚩 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬      "तव शौर्याचा एक अंश दे।        तव धैर्याचा स्पर्श दे।          तव तेजातील किरण दे।          तव जीवनातील एक क्षण दे।      श्रीमंत छत्रपती शिवरायांचा आज ३ एप्रिल १६८० हा जगाच्या इतिहासतील एक काळाकुट्ट भयाण दिवस,ह्या दिवशी दगडाचा सह्याद्री अश्रूंनी भिजला होता,त्या दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने टाहो फोडला होता.तो आजच्याच दिवशी शौर्य,धैर्य, पराक्रम,नितीमत्ता,प्रजाप्रेम,स्वातंत्र्याचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त करणारे आणि ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही तर, ह्या सकल त्रिलोकाचे पालनकतेॅ तारणहार राजमान्य राजश्री,अखंड लक्ष्मीलंकृत,महापराक्रमी,महाप्रतापी महाराजाधिराज,गो ब्राम्हण व रयतप्रतिपालक छत्रपती शिवबा महाराज हे रयतेला पोरके करून अनंतात विलीन झाले.. हा सह्याद्रीचा सिंह चिरनिद्रेत गेला. पण शिवराय आम्हाला सोडून गेले नाहीत,ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र,सूर्य असे तोवर राहतील. ज्यांच्या उपकारांची परतफेड आपल्याला आणि येणाऱ्या हजारो हिंदुच्या पिढ्यांनाही करता येणार नाही. अशी परमचैतन्यदायी देवतातुल्य राजांच्या जाज्वल्य स्मृती अनादी अनंतकाळापर्यं आपल्याला जगण्याचे सामर्थ्य देतील अशा ह्या अलौकिक,अद्वितीय महामानवास आमचा कोटी कोटी त्रिवार मानाचा मुजरा! शिवाजी महाराजांना त्यांच्या ३४१व्या स्मृतिदिना निमित्त विनम्र विचाररुपी अभिवादन करत आपण त्यांच्या उत्तुंग जीवनकुंभातुन अमृतकण घेवु या.. शिवबांसारखे महानरत्ने होवुन गेले, चरीत्र त्यांचे अभ्यासु या.. आपणही त्यांच्यासम व्हावे हाच चरीत्रातुन घेवु बोध खरा.. शिवनेरी या उंच किल्यावर फाल्गुण वद्य तृतीया शके१५५१.१९फेब्रुवारी१६३०रोजी के.१९फेब्रुवारी१६३०रोजी शिवनेरी या उंच किल्यावर जाहला.छत्रपती शिवाजीराजांच्या जन्माला जवळपास चारशे वर्षे होत असले तरी,त्यांची कीर्ती,त्यांची महानता आणि त्यांच्या विषयीचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे.चंद्र-सूर्य असेपर्यंत त्यांचे मोठेपण कायम अबाधित राहणार आहे. ज्याप्रमाणे सूर्य पृथ्वीवरून दिसतो त्यापेक्षा लाखो पटीने तो मोठा आहे,त्याचप्रमाणे युगप्रवर्तक शिवाजीराजे इतिहासकारांना, संशोधकांना,अभ्यासकांना जेवढे माहिती आहेत. त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठे आणि महान आहेत.शिवराय हे नाव उच्चारताच अंगावर काटा उभा राहतो...हृदयाचे ठोके वाढतात...शरीरात एक वेगळीच उर्जा निर्माण होते.छाती अभिमानाने फूलते.अशा माझ्या राजांचा जन्मदिन.केवळ त्यांच्यामुळच मी माझ आजच नावही अभिमानाने उच्चारु शकतो.     आज राजांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने मनामनात शिवभक्तीचे..शिवशक्तीचे शब्दरुप नगारे वाजवुन वैचारीक वंदन करत शिवरायांना विनम्र अभिवादन करु शकतो. शिवस्मृतीदिन म्हणजे,नुसते विनम्र अभिवादन करणे नसून राजांनी आयुष्यभर केलेल्या जनजागृतीचा वसा घेवुन त्यांच्या पावनस्मृतींना उजाळा देण असाव. सोळाव्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला ...जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला, पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला, ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला ."   आपल्या प्राचीनतम देशाचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे.हा देश ज्ञानाचे माहेरघर मानला जायचा.त्यातल एक राज्य म्हणजे, महाराष्ट्र महान पुरुषांचे राष्ट्र!या महाराष्ट्रात हिरे,माणिक,रत्नांच्या खाणी नसल्यातरी,शिवरायांसारख्या कोहीनुरांने जगाला प्रकाशित केल. अनेक नररत्नांनी महाराष्ट्रभुमीला महान राष्ट्र बनवल.देशाला सर्वच क्षेत्रात समृृद्ग वारसा दिला.दिल्ली जरी,देशाची राजधानी असली तरी,देशाची आथिॅक राजधानी महाराष्ट्रात आजही आहे.देशात स्वातत्र्यांचा मुलमंत्र दिला तो शिवबांच्या महाराष्ट्रान.आपण मुघलांचे गुलाम होतो.अस आपणास आजवर इतीहासान शिकवल.त्याच मुघलांवर मराठ्यांच वर्चस्व होत.दिल्लीचा बादशहा महादजी शिद्यांना विचारुनच पाणी प्यायचा.महाराष्ट्र ते सबंध देशात अगदी अफगाणीस्तानापर्यंत मराठ्यांचे घोडे पाणी प्यायचे.शिंदे होळकरांच्या जहागीर्‍या आजही पहावयास मिळतात.अहील्यादेवींच नाव देशभर घेतल जात.आजही शिंदे घराण राजस्थानच्या राजकारणात आहे.ही सारी मंडळी शिवबांच्या स्वराज्याचेच पाईक.मला वाटत आजवर झालेल्या राजांपैकी केवळ शिवबाच श्रेष्ठ ठरतात. कारण त्याच राज्य त्यांच्यानंतरही वधिॅष्णु होत गेल.अध्यात्मीकतेतही महाराष्ट्रभुमीन विश्वगुरु बनण्याकडच पहिल पाउल महाराष्ट्रान टाकल."आता विश्वात्मके देवो.."हा विश्वात्मकतेचा संदेशही महाराष्ट्राने दिला.ज्ञान प्रवाहीत करत देशगौरव वाढवला.    चरिथ भिक्खव्वे चारिक,बहुजन हिताय बहुजन सुखाय।   लोकांनु कंपाय ,आत्तानु हिताय। आदि कल्याण,मध्य कल्याण,     अंंत कल्याण !!     पाली भाषेतील बुद्धांची शिकवण रुजवणाऱ्या ओळी छत्रपती शिवाजीच्या शिवराज्याचे वैशिष्ट्य सांगून जातात.    आज आपण शिवस्मृतीदिनानिमित्य केवळ फोटोला हार घालून,भगवे फेटे आणि झेंडे घेऊन 'जय शिवाजी,जय भवानी' घोषणा देणे. एवढ्यापुरताच स्मृतीदिन नसावा तर,स्मृतीदिनाचा अर्थच पावन स्मृतींना उजाळा देण्याचा व स्मृतीकुंभातुन पावन कण घेवुन आपल्या जीवनाला उजाळा देण्यासाठी व्हावा. आज समाजाला विस्मृतीतुन स्मृतीकड नेवुन जागृतीकडे नेण्यासाठी,व समाजप्रबोधन घडवण्यासाठी हा स्मृतीदिन त्याचसाठी तर म.फुलेंनी १८७०साली प्रथम शिवजयंती पुण्यात साजरी केली.त्यानंतर लोकमान्यांनी शिवजयंतीच्या माध्यमाने लोकसंग्रह करुन स्वातंत्र्याची चळवळ तळागाळापर्यंतपोहचवली.शिवजयंतीचा उत्सव महाराष्ट्रात तर,साजरा झालाच,पण महाराष्ट्राबाहेर बंगाल,पंजाब आणि इतर सर्वच प्रांतांमध्ये साजरा होवु लागला.शिवाजी महाराज विचाररुपान भारतभर पोहोचले.भारताबाहेर अमेरिका आणि जपानसारख्या परदेशातही शिवजयंती साजरी झाल्याचे उल्लेख सापडतात.समग्र हिंदुस्थानात आणि बाहेरच्या देशातही शिवाजी महाराजांचा किर्तीसुगंध पसरला आणि शिवजयंतीच्या उत्सवाला टिळकांच्या अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.     शिवरायांनी उभारलेल स्वराज्य भुमीक्षेत्रफळान जरी मोठ नसल तरी,ते मनक्षेत्रफळान व्यापक  होत गेल.शेतकरी जसा शेतीत पेरणी करण्याआधी शेत नांगरुन घेतो.शेतातल तन काढतो अगदी त्याचप्रमाणे बालशिवबांनी रयतेच्या मनात स्वराज्य रुजण्यासाठी मावळखोर्‍यातल्या मावळ्यांच्या झोपडीत गेले.त्यांच्या अंगणात  घोंगडीवर बसुन त्यांच्या घरची कांदाभाकरी आनंदान खात त्यांच्या मनात स्वराज्याआधी आपण सारे बंधु आहोत ही बंधुत्वाची भावना रुजवली.समता आणण्याआधी मनामनात समरसता रुजवावी लागते.शिवबांनी बंधुत्वाच दर्शन घडवतच,त्यांच्या सुखदु:खाशी समरस होतच मनामनात समरसता रुजवली.शिवबांच्या सैन्याला 'मावळे' अस म्हटल्या गेल.मावळे म्‍हणजे तरी काय ? सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्‍याला 'मावळ' आणि खोर्‍यातील सैनिकांना "मावळे" म्हणत.हा शब्‍द कुठल्‍याही विशिष्‍ट जातीचा किंवा धर्माचा नाही तर तो,निजामशाही,अदिलशाही,कुतुबशाही, बरीदशाही,मुघलांच्या क्रुर टापांखाली उद्घस्त झालेल्या,अर्ध्या भाकरीसाठी स्व:तला विकण्याप्रत हिनदिन,गलितगात्र बनलेल्या  भूमिपुत्रासाठी वापरला गेला.अशा पोटपाठ एक झालेल्या मावळ्यांच्या समाजमनात शिवरायांनी स्वाभिमानाची ज्योत पेटवण्याच अद्बितीय कार्य अशा काळात केल त्या समयाला महाराष्‍ट्रातच नव्‍हे तर,संपूर्ण देशात चार्तुवर्ण व्‍यवस्‍थेची काटेकोर अंमलबजावणी होत होती.त्याच काळात समरसवादी शिवशाहीचा उदय झाला.महाराजांनी शूर-वीरांना आपल्‍या सोबत घेतले. अठरापगड जातीचे सैन्य पदरी बाळगणारा,बहुजन समाजातील सैन्यांच्या हाती शस्त्र देऊन त्यांना क्षत्रिय बनवणारा म्हणजेच "विष्णूमय जग,वैष्णवांचा धर्म,  भेदाभेद सारे अमंगळ.."     तुकोबांचा अभंग वास्तवात आणला.जातीयता व भेदभावा पलीकड जावुन समरस भाव मनामनात रुजवत अठरापगड जातींच्या मावळ्यांना मानाचे स्थान मिळवुन देणारा राजा.या मावळ्यांनी रयतेच राज्य;स्वराज्य निर्माणास्तव अहोरात्र प्राणांची पर्वा न करता  धडपड केली.सह्याद्रीच्या डोंगरकपारीत गलितगात्र मावळ्यांच्या मनात स्वातंत्र्याचा उद्गघोष घडवला.पराधीन हिंदुमनात स्वातंत्र्याची पेरणी करण्यासाठीच तर,शिवबांच अवतारी कार्य होत.    शिवाजीराजांनी स्वराज्य उभे करून समतेचे राज्य निर्माण केलेच; परंतु त्यांच्या मृत्युपश्चात म्हणजे आजच्याच दिवसानंतरही त्यांनी लोकांना भरभरून दिले आहे.शिवरायांनी घालून दिलेले आदर्श आणि त्यांचे मानवतावादी विचार पुढे छत्रपती शंभुराजे,छत्रपती राजाराम,ताराउ,छत्रपती शाहु,बाळाजी विश्वनाथ,पहिला बाजीराव ते १८१८पर्यंत त्यांच्या पाईकांनी मराठ्यांचा जरीपटका अटकेपार पोहचवला.या शौर्याच उगमस्थान म्हणजे शिवबा.शिवबांचे विचार आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात.     आपण शिवबा,शंभू,शाहू,फुले,आंबेडकर, बसवेश्वर,सेवालाल,अशा महापुरुषांच्या जयंत्या,पुण्यतिथ्या साजर्‍या करतो.आपल्या पूर्वजांच्या जयंत्या वा पुण्यतीथ्या का साजर्‍या होत नाहीत? हा विचार आपण केला पाहिजे.'जे स्वतःसाठी जगतात ते कायमचे मरतात,जे समाजासाठी जगतात,ते नेहमीच चिरंजीव असतात.असाच ओजस्वी इतिहास आहे माझ्या राजाचा.'मरावे परी किर्तीरूपे उरावे,ही पंक्ती सत्यात उतरविणारा आदर्श स्वराज्य संस्थापक म्हणजे,छत्रपती शिवाजीराजे.या राजाने सोने,मोती माणिक,हिर्‍याहुन अधिक जीवाला जीव देणारी सोन्यासारखी माणसे कमविली.रयतेची आदर्श राजवट निर्माण केली.शिवरायांबद्दल समर्थ लिहतात,   निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु ।    अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ॥   परोपकाराचिये राशी । उदंड घडती जयासी ।     तयाचे गुणमहत्त्वासी । तुळणा कैची ॥     यशवन्त कीर्तिवन्त । सामर्थ्यवंत वरदवन्त ।      नीतिवन्त पुण्यवंत । जाणता राजा ॥       आचारशीळ विचारशीळ । दानशीळ धर्मशीळ।         सर्वज्ञपणे सुशीळ। सकळां ठायी ॥         नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।           पुरंदर आणि शक्ती । पृष्ठभागीं ॥           धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।             सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥            या भूमंडळाचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।            महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हां कारणे ॥          आणिकही धर्मकृत्ये चालती । आश्रित होऊन कित्येक राहती ।          धन्य धन्य तुमची कीर्ती । विश्वीं विस्तारिली ॥           कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसी धाक सुटला ।            कित्येकांस आश्रयो ज़ाहला । शिवकल्याण राजा ॥    यातला प्रत्येक शब्द न शब्द शिवरायांच स्मृतीचरीत्रसुगंध उधळत जातो.ते केवळ महाराष्ट्रभुमीचच नव्हेतर,अवघ्या भारतवर्षाच दैवत!नाव उच्चारताच रक्त सळसळत देशभक्ती जागते.   इतीहासाच्या पानापानावर अनेक राज्यांनी राज्यही केलही असेल पण रयतेच्या मनावर राज्य करणारा हा जाणता राजा माझा शिवबा!जगात अनेक राजे होऊन गेले पण जगातील सर्वोत्तम राजा ज्यांना म्हटलं जाऊ शकतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.हे सर्वोत्तम राजेपद असेच येत नाही.त्यासाठी खूप सारी गुणवैशिष्ट्ये अंगी असावी लागतात.तेव्हाच त्या सर्वोच्च पदावर पोहोचता येतं. शिवाजी महाराज यांच्या अंगी देखील विविध गुण होते.असे एकही क्षेत्र नसेल,ज्याची माहिती राजांना नसावी.सगळ्या विषयात राजे निपुण होते.माणसाला उच्च पदावर पोहचण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते,त्याची सुरुवात स्वतःच खासगी आयुष्यातून करावी लागते,स्वतःच सवयी,नियम त्याला आदर्शवादावर घेऊन जातात.खूप प्रयत्न केल्याने यश मिळते. असे नाही परंतु यश मिळालेल्या माणसाने खूप सारे प्रयत्न करून आणि कष्ट करून ते मिळवलेले यश टिकवायचे असते.   शिवाजी राजांच्या सर्वोच्चपदाची सुरुवात त्यांच्या वैयक्तिक दैनंदिन दिनचर्येत दिसुन येते.ते मितआहारी होते.युद्ध किंवा युद्धजन्य परिस्थिती नसेल त्यावेळी कमीत कमी व वेळच वेळी जेवण हा त्यांचा परिपाठ होता.राजे उपवास तपास कधी करत नसत.उपवास करणारे अन्नाचे चिंतन करतात व काम थांबवितात.उपवास संपल्यानंतर एकदम भरपूर खातात व खाऊन झाल्यावर सुस्त होऊन स्वस्थ झोपतात.राजांचे राहणीमान,आहार,उठण्या झोपण्याच्या वेळा,  व्यायाम या सगळ्या सवयी आदर्श म्हणून घ्याव्यात अशाच होत्या.यामुळेच त्यांची  कार्यक्षमता वाढत राहीली.संयमीपणा, आत्मविश्वास,मुत्सद्दीपणा,शुद्धशीलता,प्रतिभावान,स्वाभिमानी प्रेमळ,उदारपणा, निष्कपटीपणा,अक्रूरता,नि:संशयीपणा, अस्मिता,सर्वधर्मसमभाव,उत्तम संघटक,कुशल योद्धा,बहुभाषिक, उत्तम जाणकार,शास्त्रात पारंगत, स्वच्छ व पारदर्शक राजकारणी, सुधारक,कुशल व्यक्ती परीक्षक,उत्कृष्ट आरमार प्रमुख,दुर्ग अभियंता, जनानखान्याचा द्वेष्टा,अचूकनियोजन,उत्तम वैद्य,अर्थशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ,कृषिशास्त्रज्ञ,स्थापत्य तज्ज्ञ,प्रयत्नवादी व सत्यवादी, सातत्यवादी,कुळवाडीभूषण,उत्तम मित्र,पुत्र,पिता,पती,वैज्ञानिक दृष्टिकोन,महिलांचा खरा सन्मानकर्ता,ज्यांच्या राज्यात स्रीयांना पुजनीय मानल. दूरदृष्टी,निर्व्यसनी,धर्मज्ञानी,सहृदयी, शत्रूशी वैर न बाळगता संवाद ठेवणारा,शेतकर्‍यांचा राजा म्हणजे शिवाजी महाराज होय.इतके सारे गुण एकाच माणसामध्ये एकवटल्याने हा आपला राजा आहे.ही भावना लोकांच्या मनामध्ये आज देखील चिरंजीव आहे.     आज दिवसाढवळ्या शिवबांच्या देशात महिलांना पेटवले जाते, दुष्कर्म होतात,क्षणाक्षणाला अत्यंत नीच पद्धतीने महिलांचा विनयभंग होत आहे.सर्व साधने,यंत्रणा असतानादेखील महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आपण कमी पडत आहोत.परंतु शिवाजीराजांच्या स्वराज्यात महीलेला मानाचे स्थान होते.ते स्रीयांना मातृशक्ती समजायचे.शिवरायांच्या आयुष्यात त्यांनी स्त्रियांना फार मोठा सन्मान दिला ज्या काळात व्यवस्थेने स्रियांवर अन्यायकारक बंधने घातली होती त्या काळातही स्त्रीला शक्ती देवतेच स्थान शिवबांनी मिवळुन दिल. अतिशय सन्मानाची वागणूक देणारा हा राजा.गरीब मुलीवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडण्याचे आदेश दिले. व आपल्याा स्वराज्यातील बेबंदशाहीला आळा घातला.यावेळी त्यांनी रांझ्याच्या पाटलाची जात पाहिली नाही   राजांच्या दरबारात कधीही नृृृत्य मैफील घडली नाही.त्यांच्या चारित्र्यसंपन्नतेचा पुरावा राजांनी बोट कापलेला शाहीस्तेखानच देतो.राजांनी परस्त्रियांना मातेसमान मानले.एवढेच नाही तर, शत्रुपक्षातील स्त्रियांना साडी चोळी देऊन सत्कार केला व त्यांचे रक्षण केले.असाच शाहीस्तेखानाच्या डायरीतील प्रसंग.शाहिस्तेखानला रोज "डायरी"लिहिण्याची म्हणे सवय होती.त्या डायरीचे नाव होते "शाहिस्तेखान बुर्जी" त्यामध्ये शिवरायांनी"केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद केलेला असल्याचे वाचनात आले.याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे.तो असं लिहितो, "शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लालमहालातून निघून गेले.काही वेळाने गोंधळ थांबला.शाहिस्तेखानाची  बहिण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली,'भाईजान मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,भाईजान!' त्यावेळी आपली बोटं छाटलेला शाहिस्तेखान वेदनेन व्याकुळ असुनही तो म्हणाला,"शिवाजीची माणसं तिला पळवणार तर नाहीतच,पण जरी,त्यांनी पळवली तरी"बेफिक्र" राहा.कारण! तो "शिवाजी राजा"पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल.याला म्हणतात चारीत्र्यावरचा विश्वास!दुश्मनही महाराजांच्या चारित्र्यावर विश्वास ठेवायचे!शत्रूंच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवल्याची व शत्रु स्रीयांची गढी परत दिल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.शिवाजी राजांच्या सैन्याकडून जर पराभव होऊ लागला तर, स्त्रियांची वस्त्रे घालून पलायन करा असे सांगून अनेकांनी आपले प्राण वाचवले आहेत.कारण त्यांना माहीत होते,शिवरायांचे सैन्य स्त्रियांवर अत्याचार करत नाही.एवढंच नाही तर, स्वतःच्या सुनेला म्हणजेच संभाजी राजांची पत्नी येसूबाई यांना महाराजांनी स्वतंत्र कारभार नेमून दिला. हाताखाली चिटणीस मंडळ दिले व स्वतंत्र मुद्रा वापरण्याचा अधिकार दिला.मला वाटत,शिवरायांएवढी सकारात्मक व उत्तुंग भुमिका आजवर कुण्या राजाने घेतल्याच वाचनात आल नाही.ते ऐकमेवाद्गितीयच होते.आजही महीलांना पडद्याआड ठेवुन घराच्या बाहेर बाहेर पडू न देणारे,पायाचे नख दिसले किंवा पदर जरी सरकला तर,सुनेला दूषण देणारे,शिवरायांचा हा आदर्श घेतील काय?"शिवचरित्रातून हा गुण स्वीकारून प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. आपल्या घरातील आई बहिण व इतर स्त्रियांना सन्मानकारक वागणूक द्यावी. त्यांना निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यावे,घरातील मुलींना उच्च शिक्षण द्यावे. शिवचरीत्रातुन बोध घेत निकोप  व सर्व समावेशक समाज निर्मितीसाठी आपण प्रयत्न करावेत.    भारताचाच नव्हेतर,जगाच्या इतिहासाचा अभ्यास केला तर,असा राजा आढळणारच नाही.आजपर्यंतच्या जागतिक इतिहास तज्ञांच्या मते,छत्रपती शिवरायात राजा बनण्यासाठीचे अलौकिक राजगुण होते.याबाबत इटालियन जागतिक किर्तिचे तज्ञ "मॅकिल व्हॅली" यांनी शिवरायांबद्दल मांडलेली तत्वे दोन विभागात मांडली.न्याय नीती व चारित्र्यसंपन्न असा हा जाणता राजा दिसण्यास सुंदर तर होताच पण याचबरोबर निरोगी व आरोग्य संपन्न होता.चाणक्यासम बौद्गीक संपदा राजांकड होती.त्यांची नैतिक पातळी अतिि उच्च दर्जाची होती.ते आध्यात्मिक आणि तात्विकदृष्ट्या ज्ञान संपन्न होते.त्यासह कर्तव्यदक्षता,नि:स्वार्थी आणि संयमी तसेच जनतेसाठी झटणारा जाणता राजे होते.सिंहाप्रमाणे शुर,नीती व अनीतीचा वेळप्रसंगी विचार करणारे, द्रव्याची अभिलाषा नसणारे,परधर्माचा आदर त्यांनी नेहमीच राखला म्हणजे ते धर्मनिरपेक्ष् होते.# असं म्हणता येत नाही. याउलट त्यांना स्वधर्माबद्गल नितांत आदर होता. जबरीने धर्मातरित केले गेले त्यांना स्वधर्मात घेऊन आज घरवापसी अस म्हटल्या जात ते शेकडो वर्ष अगोदर घडवले."धमों रक्षीत:रक्षीता" धर्म वाढवित नेणारा धामीॅक राजा म्हटल जात. ते जरुर इतर धमिॅयांशी संहीष्णुतेन वागायचे पण जबरीने धर्मातरित केले गेले त्यांना स्वधर्मात घेऊनही यायचे. आज घरवापसी अस म्हटल्या जात ते शेकडो वर्ष अगोदर घडवले."धमों रक्षीत:रक्षीता" धर्म वाढवित नेणारा धामीॅक राजा म्हटल जात.याच जिवंत उदाहरण नेताजी पालकराच होत.ते दीर्घकाळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते.त्यांना 'प्रतिशिवाजी' म्हणजेच 'दुसरा शिवाजी' असेही म्हटले जायचे.त्यांनी अनेक युद्धे गाजवली..अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. पुरंदरच्या तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी वादविवादाचा बनाव करून त्यांना मोगलाकडे पाठविले,त्यांनी आदीलशहावर आक्रमण केले.मुघलांनी त्यांचे धर्मांतर केले.नेताजींना अरबस्तानात पाठविले. तसेच त्यांना नजरकैदेत ठेवले.यामुळे ते स्वराज्यापासून दूर होते.त्यांनी मुघलांची चाकरी केली,नऊ वर्षांनी नेताजी मुघलांना हुलकावणी देवुन पुन्हा स्वराज्यात आले.स्वराज्यात पुन्हा आल्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पाडून त्यांना परत हिंदू धर्मात प्रवेश दिला.त्यांच परीवर्तन करुनच ते थांबले नाहीत तर समाजाने त्यांना स्वीकाराव म्हणून त्यांनी त्यांच्या मुलाचा जानोजीचा स्वतःच्या मुलीशी विवाह करून दिला.धर्माॅधांनी तोडलेली मंदीर पुन्हा उभारली.अन्य धमिॅयांशी ते सहिष्णुतेने वागले. सत्तेच्या मादाने आजवर अनेक शाह्यांनी मंदीरे तोडली पण शिवबांनी मात्र अन्य धमिॅयांच्या प्रार्थनास्थळाला धक्का पोहचु दिला नाही.इतिहासाचा अभ्यास केला असता,छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक राजगुणांची ठळक वैशिष्ठे पुढील प्रमाणे दिसून येतात.स्वधर्माभिमानी परंतू इतर धर्मीयांशी सहिष्णुतेने वागणारा राजा.संत सज्जनांचा उपासक परंतू दुष्टांचा संहार करणारा राजा.न्यायनीती बाळगणारे व त्यांच्या शौर्याची कदर करणारा राजा.वैदिक धर्माच्या देव-देवळांबरोबर मुस्लिमांच्या मशिदी व मकबरे यांचे पण रक्षण करणारा राजा.युद्धाच्या वेळी कुराणाची प्रत सापडल्यास ती आदरपुर्वक मुल्ला - मौल्लवीकडे परत करणारा राजा,स्त्रियांच्या आब्रुचे,लहान मुलांचे,म्हातार्या माणसांचे रक्षण करा,शरण आलेल्यांना ठार मारू नका अशी सैन्यास ताकिद देणारा राजा.इतरधर्मात हस्तक्षेप न करता.न्याय व नीती ही तत्वे शिवरायांनी अंगीकारले.   आज शिवबांना धर्मनिरपेक्ष ठरवण्यात त्यांच्या सैनिकात मुसलमान सहकारी कसे राजांशी प्रामाणीक होते हेच सोशल मिडीयावरुन रंगवल जात असताना रंगवण्याच्या नादात हे बुद्गीवंत रायरेश्वराच्या मंदीरातील शपथेपासुन ते राज्याभिषेकाच्या सुवर्ण क्षणांपर्यत साथ दिलेल्या सवंगड्यांना विसरत असल्याच दिसत.राजांनी कुठल्याच जातीच्या द्गेष केला नाहीतर,अठरापगड जातींची मोट बांधुन स्वराज्य घडवल.जातीपेक्षा प्रवृृृत्तीचा प्रखर विरोध त्यांनी केला.शिवरायांनी आपल्या राज्यात कधीच भेदाभेद केला नाही. आज काही तथाकथित मंडळी जातीचे लेबल लावून अफजलखान वधाच्या वेळी कृृष्णाजी भास्कर हा अफजलखानाचा वकील शिवरायावर जीवे मारण्यासाठी चालून आला  व तो कसा घातकी होता. याचं वर्णन रंगवतात एका विशिष्ट जातीला टागेॅटही करु लागतात.पण त्याच वेळी स्वराज्य निमिॅतीच्या विरुद्ध त्यांचे सगेसोयर्‍यांचे नाव मात्र घ्यायचे सहजपणे टाळतात.क्रुष्णाजी भास्कर कुलकर्णी स्वराज्यद्रोही होता म्हणून सर्वच ब्राह्मणांचा शिवरायांनी कधीच विरोध केला नाही. त्यांच्या सैन्यात व किल्लेदारपदी मुरारबाजी बाजीप्रभू असे स्वराज्यप्रेमी मंडळी होती. हेही जाणून घ्यायला हवे. त्यांनी आपल्या सैन्यात  अठरापगड जातीच्या लोकांना  स्थान देऊन  त्यांना क्षत्रिय बनवलं आपल्या राज्यात कधीच भेदाभेदाला स्थान न दिल्याच उत्तम उदाहरण म्हणजे,त्यांच अष्टप्रधान मंडळ यात कृष्णाजीच्या ज्ञातीबांधवांना शिवरायांनी दिलेलं मानाचं स्थान      छ.शिवरायांनी शेतकर्यांच्या हितासाठी अनमोल कार्य केले.कारण मासाहेबांनी उद्भस्त पुण्यात शिवरायांच्या हाती त्याचा नांगर देऊन प्रथम शिवबांना शेतकरी बनवलं हे आपण जाणतोच त्याच वेळी आपल्या सैनिकांना शेतकऱ्यांच्या काडीलाही हात लावू नका देणारा हा जाणता राजा.आज शेतकर्यांचे दिल्लीत मोठे  आंदोलन सुरू असताना याच वेळी शिवजयंती आल्याने  याप्रसंगी  सहजच  शिवरायांच्या काळातील  शेतकऱ्यांची अवस्था  हा विषय पुढे येतो.    शेतकरी सुखी तर, प्रजा सुखी,प्रजा सुखी तर,राजा सुखी ही त्रिसुत्री जाणुन शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करून शेती सुधारणा करणारा व शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका. अशी सैन्याला सक्त ताकीद देणारा हा जाणता राजा.आज स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हनवून घेत, जे स्वत:ला शेतकऱ्यांचे पुत्र  असल्याचे सांगतात पण  त्यांच्या सत्ता काळामध्ये देशामध्ये लाखॊ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.खरेच या नेत्यांना छ.शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृृृृृृत्वाची जाणीव असती तर, जगाचा पोशिंदा असणार्या शेतकर्यांनी कधीच आत्महत्या केल्या नसत्या.याचाही विचार करण गरजेच आहे. गा    जगातील अत्यंत पराक्रमी राजांचा अभ्यास केला तर,सिकंदर, नेपोलियन,ज्युलियस,हॉलिबूड रॉबर्ट वगैरे अनेक देशी,विदेशी राजांचा व छत्रपती शिवाजी राजांचा तुलनात्मकद्रुष्ट्या अभ्यास केला असता,शिवाजी राजांच्या नैतिकतेशी हे पराक्रमी राजे बरोबरी करू शकत नाहीत कारण  २७ वर्षे घोड्यावरील मांड कधी काढली नाही व आपली तलवार कधी म्यान केली नाही.मद्याच्या थेंबालाही कधी स्पर्श केला नाही.आपल्या दरबारात कधीच नाचगाण्यांची मैफील त्यांनी सजविली नाही. आज सबंध भारतीय समाजाला "शिवाजी महाराजांसारख्या"चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे.घरवापसी अस म्हटल्या जात ते शेकडो वर्ष अगोदर घडवले.तर आज शिवराय धर्मनिरपेक्ष ठरवण्यासाठी शिवरायांच्या सैन्यात ईमानदार मुस्लीम होते.अगदी खरय पण शिवबा जातीभेद बाळगणारे नव्हते.जातीद्गेषाच राजकारण त्यांनी कधीच केल नाही.इतकच कायतर,विश्वासघाताने ठार करावयास आलेल्या बलाढ्य व शुर अशा अफजलखान या शत्रुला ठार केल्यानंतर सन्मानाने त्याची कबर बांधली.शिवकालापर्यंत जवळ जवळ ६०० राजे होऊन गेले. असा इतिहास सांगतो पण शत्रुचीही कबर बांधुन म्रुत्युनंतर वैर संपते हा संदेश फक्त शिवरायांनीच दिला.इतकच नव्हेतर,बाटवुन धर्मांतरीत केलेल्या आपल्या तानाजी मालुसरेंच स्वर्धात परावर्तन केल.आज आपण घरवापसी हा शब्दप्रयोग ऐकतो.तो प्रथम भारतात शिवरायांनी घडवला. इतिहासाच्या पानावर,रयतेच्या. मनावर,मातीच्या कणावर अन विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा राजा शिवछत्रपती! काय वर्णू माझ्या राजाची महती माझा राजा केवळ शिवरच नव्हता तर,परकीयांच्या उपकाराची खोळ झुगारुन देणारा होता.मग ती जमीनीवर असो वा व्यवहारात असो,राज्यव्यवहारातल्या फारशी या परकीय भाषेला त्यागुन माय मराठी भाषेचा पुरस्कार केला. महाराजांनी रघुनाथ पंडितांकडून एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला.हा कोश फार्सी-मराठी नसून दख्खनीयावनी(उर्दू)-संस्कृत आहे. त्यातल्या १३८० शब्दांपैकी फारतर दहा टक्के शब्द मराठीत अजूनही प्रचलित आहेत.इ.स.च्या सातव्या शतकात प्रथम व्यापाराच्या निमित्ताने भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरब आले, नंतर तुर्क, मोगल, पोर्तुगीज, इंग्रज आले, भारतावर त्यांचे राजकीय वर्चस्वही काही काळ टिकून राहिले.त्यामुळे अगदी यादवकालापासून, म्हणजे १२ ते १४ शतकापासून फार्शी शब्दांचा वापर मराठी भाषेत होऊ लागला. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेश,स्वधर्म आणि स्वभाषेच्या रक्षणार्थ ‘महाराष्ट्र राज्याची स्थापना केली‘ तेव्हा राज्यकारभारात आणि दैनंदिन व्यवहारात आलेल्या अनेक फार्सी, अरबी, तुर्की- म्हणजेच या नव्या शब्दांना पर्यायी संस्कृत अथवा प्राकृत शब्द योजण्याची कल्पना त्यांना सुचली.      आज आपण चीनच्या भिंतीच कौतुक करतो.ती भिंत अवघी ३००कि.मी लांबीची बांधायला १५०वर्ष लागले पण अवघ्या ५० वर्षाच्या आयुष्यात शिवरायांनी ४०००कि.मी भरेल एवढ किल्यांच बांधकाम केल.आम्ही नेपोलीयनच,अलेक्झांडच कौतुक मोठ्या उत्साहाने करतो इतकच कायतर?साधी क्रिकेट मॅच जिंकली म्हणजे आपला उर अभिमानाने फुलुन येतो. यामुळे आपण खेळाडूला मालामाल करतो पण शिवबा व शंभुराजांच कौतुक करायला आपली जीभ चाचरते पण महाराज ज्यांच्याशी लढले अशा इंग्रज,डच,फ्रेंच, पोर्तुगिजांनी त् भारतात पाय पसरु नये म्हणुन आरमार उभारले. त्यांनीही महाराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले.पाश्चात्य विचारवंत शिवरायांवर स्तुतीसुमने मुक्तहस्ते,मुक्तठाने उधळली.    जगभरातील संशोधक आणि तज्ज्ञ शिवरायांच्या कार्याने प्रभावित झाले.  त्यांनी महाराजांना आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणुन मान्यता दिली.त्यांच्याबाबत जागतिक स्तरावर बोलल्या जाणाऱ्या गोष्टी भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहेत.आज शिवस्मृतीदिनानिमित्त महाराजांविषयी मान्यवरांनी काढलेले उद्गार काय होते पाहूया… म्हणतात,रॉबर्ट ओर्मी (Orme) हा ब्रिटिश इतिहास अभ्यासक म्हणतो-शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते.सैन्याचा प्रमुख म्हणून त्यांनी जितके जमिनीवर जितके अंतर पार केले तितके दुसर्‍या कुठल्याही सेनापतीने केले नसेल.आणीबाणीचा प्रसंग कितीही आकस्मिक अथवा मोठा असला तरीही शिवाजी राजांनी त्याचा विवेकाने व धैर्याने यशस्वीपणे सामना केला.जाॅन सर्विलन हा अमेरिकन लढवय्या म्हणतो-ज्या काळात शिवाजी महाराज रहात होते. त्या काळात सफल होण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक गुण त्यांच्यामधे होता. ते सतर्क होते आणि त्यांची कृती प्रखर व धाडसी असे.त्यांच्यातील सहनशीलता,उर्जा आणि निर्णयक्षमतेमुळे त्यांच्याकडुन गौरवास्पद कार्य झाले. ज्यांनी आपल्या देशी घोड्यांच्या सहाय्याने प्रचंड मुघल घोडदळाला पाणी पाजले.त्यांचे मावळे गनिमी काव्यामुळे त्याकाळातले जगातील सर्वात चांगले पायदळ होते.जे स्वाॅट  म्हणतात-शिवाजी राजे एक असामान्य योद्धे होते.सद्गुणी लोकांचे मित्र होते.त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली तर,दृढतेने ती अमलात आणली. त्यांच्या ध्येयपुतीीॅ बाबद अवगत असे.जेम्स डग्लस  हा ब्रिटिश प्रवाशी म्हणतो-कुठल्याही आणीबाणीच्या समयाच्या वेळी सजग राहून शिवरायांनी त्याला तोंड दिले.महाराजांनी आपल्या जादुई स्पर्षाने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्यांच्या महाराष्ट्रातील जनतेला अलौकीक कृत्ये करण्यास प्रेरीत केले. जनतेला सर्वोत्तम सैनिक बनवले ही जनता सरदार, कुशल राजनितीने विशारद झाली जिने शेकडो युध्दे जिंकलेल्या मुघलांचा सामना केला.अॅबी कॅरी हा १६७२ ते १६७४ दरम्यान भारत भ्रमंतीवर आलेला प्रवाशी आपल्या नोंदीमध्ये म्हणतो-शिवाजी राजे  सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत. त्यांच्या धाडसीपणामुळे ,त्यांच्या युध्दातील चपळाईमुळे व इतर गुणांमुळे त्यांची तुलना स्विडनच्या महान राजा ऍडॉल्फसशी होउ शकते.त्यांच्या जलद गतीने आणि दयाशीलतेने ज्युलियस सीझर प्रमाणे त्यांनी त्यांच्या शत्रूंचेही मने जिंकले. त्यांच्यातील नेता, धुरंधर सेनानी, जाणता राजा ही आणि अशा असंख्य गुणांची ओळख समाजाला पदोपदी होत होती.महाराजांचा काळ लोटून इतकी वर्षं झाली तरीही त्यांचे इतिहासातील स्थान आणि मान याला जराही धक्का लागू शकत नाही. सिडनी जे. ओवेन  हा लेखक म्हणतो- वीरता, देशाभिमान, धर्माभिमानाची प्रभावळ त्यांच्या कार्यवाहीत होती, ज्यातून ते प्रेरीत झाले.त्यामुळे शहाजी राजांच्या पुत्रास ते पुर्वनिश्चित,दैविक कृपापात्र मुक्तिदाता मानत होते.सतराव्या शतकात युरोप खंडात “लंडन गॅझेट” नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले,तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला होता. डाॅ.    जॉन एफ. जी. कार्अरी ( सन १६९५ ) म्हणतात-शिवाजी राजे इतके बलाढ्य आहेत की, ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगिजांबरोबरही लढतात.ते रणांगणावर ५०००० घोडे आणतात आणि त्याहुनही जास्त पायदळ आणतात.त्यांचे सैनिक मुघलांपेक्षा कितीतरी चांगले आहेत. हे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर दिवस काढतात तर मुघल बायका,विविध साधनसामग्री,तंबु घेउन जातात जणुकाही ते एक चालत फिरत शहरच असत. जेम्सडग्लस या ब्रिटीश इतिहासतज्ज्ञाने रायगडाला भेट दिल्यानंतर तो म्हणतो- हा किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही किल्ल्यामधे झाला होता.किल्ल्यांनी त्याला बनवल आणि त्यांनी किल्ल्यांना बनवल.हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती, शिवरायांच्या राज्याचे उगमस्थळ होते, त्यांच्या युध्दांचा आधार होते, त्यांच्या ध्येयांच्या पायर्‍या होते,त्यांचे घर आणि आनंद होते.त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले. ही फारच कृपेची गोष्ट होती की शिवाजी राजे दर्यावर्दी नव्हते.नाहीतर जमिनीप्रमाणे समुद्रावरही त्यांनी वर्चस्व गाजवले असते.एल्फीस्टन हे शिवाजी महाराजांबद्दल बोलताना म्हणतात-शिवाजी राजांसारखा प्रतिभासंपन्नच औरंगजेबाच्या चुकांचा फायदा उठवू शकतो. त्यानंतर धर्मासाठी प्रेरीत करु शकतो व यातून मराठ्यांमधे राष्ट्राभिमान जागृत करु शकतो.या भावनांमुळे त्यांच्याबाबत जागतिक स्तरावर बोलल्या जाणाऱ्या गोष्टी भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने अभिमानास्पद आहेत. आज शिवजयंतीनिमित्त महाराजांविषयी मान्यवरांनी काढलेले उद्गारामुळ छाती अभिमानान फुलायलाच हवी.      छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहेच.त्यांनी परकीय राम्राज्यशाहीविरुद्ध बंड पुकारून जगात स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ रोवून रयतेसाठी राज्य निर्माण केल.जगदवंदनीय जगाचा महामानव ठरलेला राजा म्हणजेच विश्ववंद्य छ.शिवाजी महाराज होय आणि म्हणुनच जागतिक इतिहास तज्ञ "अनॉर्ड टायरबन" म्हणतात- " छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर,त्यांच्या पराक्रमाचा आणी स्म्रुती चा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन आनंदाने नाचलो असतो " त्यांनी शुन्यातुन स्वराज्य तर घडवल अन वाढवल.शत्रुला नमवल.राजांच वर्णन करण तस अवघडच पण मला वाटत,नेतृत्व तेच महान की,आपला विचार चिरंजीव ठेवणार.आजवर आपल्या देशात आजवर अनेक राजे झाले त्यांना कमी लेखण्याएवढा मी मोठा नाहीच पण शिवराय ऐकमेव असे राजे त्यांच्यानंतरही त्यांच स्वराज्य  प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे राज्य वधिॅष्णु होत गेल.त्यांच्या वारसांनी अटकेपार स्वराज्यपताका फडकवली.या सार्‍यांची विचारज्योत शिवरायच..एवढच नव्हेतर,व्हिएतनाम सारख्या राष्ट्राचाचा आदर्श म्हणजे,माझे छत्रपती शिवाजी महाराज !          गाठ बांधून घेतली "काळजाशी"अशी जी सुटणार नाही,        ही आग अशी आहे की"इतिहासाची"जी कधीच विझणार        नाही,मी धगधगता प्राण आहे. स्वराज्याचा!         कधीच मरणार नाही.         शिवछत्रपतींच्या किर्तीला शब्द माझे पुरणारच नाहीत         व्हिएतनाम दक्षिण पूर्वेतील व्हिएतनामसारखा छोटा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षे अण्वस्त्रांनी सज्ज असलेल्या जगातील सर्वात बलाढ्य अमेरिकेशी लढत राहिला आणि केवळ छत्रपतींच्या प्रेरणेने जिंकलासुद्धा.छत्रपतींनीही याच गनिमी काव्याचा वापर करून मोघलांना पराभूत केले होते.व्हिएतनामी योद्ध्यांनी तोच धडा गिरवला होता.व्हिएतनाम युद्धातील विजयानंतर तेथील राष्ट्रपतींनी स्वतःच छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा धडा आम्ही गिरवला; म्हणूनच  बलाढ्य अमेरिकेला नमवू शकलो ! असे उद्गार काढले होते. व्हिएतनाम हा एक असा देश आहे की,त्याने हिंदुस्थानकडून जी प्रेरणा घेतली,त्याचा एक इतिहासच आहे. व्हिएतनाम आणि अमेरिकेत २० वर्षे युद्ध चालले.अमेरिकेला वाटत होते की,या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल.केवळ काही घंण्टेच पुरे होतील;परंतु व्हिएतनामचे युद्ध अमेरिकेला चांगलेच महागात पडले; कारण व्हिएतनामी योद्ध्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांची युद्धनीति अवलंबली होती.व्हिएतनाम या युद्धात विजयी झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रपतींना पत्रकारांनी या विजयाचे रहस्य विचारले, तेव्हा ते म्हणाले, स्पष्टच आहे की,अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवणे आपल्या देशाला शक्यच नव्हते; परंतु युद्धकाळात हिंदुस्थानातील एका शूर राजाचे चरित्र माझ्या हाती आले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही युद्धनीति ठरवली आणि ती अतिशय ठामपणे राबवली परिणामी,काही दिवसांतच आमची सरशी होत आहे,असे दिसू लागले. यावर पत्रकारांनी विचारले,तो हिंदुस्थानी शूर राजा कोण होता ?त्यावर राष्ट्रपतींनी उत्तर दिले, छत्रपती शिवाजी महाराज ! हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता,तर आज आम्ही जगावर राज्य केले असते.त्या व्हिएतनामची विचारज्योत माझा राजा शिवराय.. अशा राजांच नाव उच्चारताच हत्तीच बळ येत..उर अभिमानान फुलतो.ज्या राजाने आम्हास स्वाभिमानाने जगायला शिकवुन स्वराज्य घडवले.व आजच्याच दिवशी पोटच्या पोराप्रमाणे जपणार्‍या रयतेला सोडुन स्वराज्याचा अखेरचा निरोप घेतला..अशा राजांच राजेपण..मोठेपण जनमानसांच्या मनसिंहासनावर आजही टिकुन आहे. राजांच राजेपण कालपण ..आजपण..सुर्याचंद्र असेपर्यंत.. शिवरायांच महत्व सुर्यअसेपर्यंत.. शिवस्मृती दिनानिमित्य त्रिवार मानाचा मुजरा..विनम्र शिवाभिवादन!! शिवस्मृतीदिना निमित्य राजांकड मागण मागु या.. "तव शौर्याचा एक अंश दे। तव धैर्याचा स्पर्श दे। तव तेजातील किरण दे। तव जीवनातील एक क्षण दे। ___🖋️ शिवश्री चंदु चक्रवार भोकर   शिवस्मृतीदिन ३एप्रील २०२१ ▬▬▬▬ ▬▬▬   🚩ஜ۩۞۩ஜ 🚩▬▬▬🚩▬▬🚩          

 🚩▬▬▬▬▬🚩🔹ஜ۩۞۩ஜ🔹▬▬▬🚩▬▬▬🚩            "तव तेजातील एक किरण दे.." शिवरायांच्या स्मृतीदिनानिमित्य विचाररुपाने अभिवादन..!  .. ▬▬▬▬▬▬▬▬🚩 ஜ۩۞۩ஜ ▬▬🚩▬▬▬▬▬🚩 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬      "तव शौर्याचा एक अंश दे।        तव धैर्याचा स्पर्श दे।          तव तेजातील किरण दे।          तव जीवनातील एक क्षण दे।      श्रीमंत छत्रपती शिवरायांचा आज ३ एप्रिल १६८० हा जगाच्या इतिहासतील एक काळाकुट्ट भयाण दिवस,ह्या दिवशी दगडाचा सह्याद्री अश्रूंनी भिजला होता,त्या दुर्गदुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने टाहो फोडला होता.तो आजच्याच दिवशी शौर्य,धैर्य,पराक्रम,नितीमत्ता, प्रजाप्रेम,स्वातंत्र्याचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवाला मुक्त करणारे आणि ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे,आमचे नाही तर,ह्या सकल त्रिलोकाचे पालनकतेॅ तारणहार राजमान्य राजश्री,अखंड लक्ष्मीलंकृत,महापराक्रमी,महाप्रतापी महाराजाधिराज,गो ब्राम्हण व रयतप्रतिपालक छत्रपती शिवबा म...