देशाचे भाग्य बदलण्यासाठी मतदान कराच..
भारताच्या स्वातंत्र्यासाठी लक्षावधी राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या बलिदानातुन भारत स्वतंत्र झाला.स्वातंत्र्यवीरांनी आपल आयुष्य वेचल.स्वराज्य,स्वदेशी,स्वावलंबन बहीष्कार या चतु:सुत्रीने स्वातंत्र्य चळवळ टिळकांनी तळागाळापर्यत पोहचवली. सुभाषबाबुंनी आझाद हिंद सेना स्थापुन इंग्रजांना सळो की पळो केले.स्वातंत्र्यवीरांनी जन्मठेप भोगली.लक्षावधींनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. स्वराज्य आले,सुराज्य येण्यासाठी आपण आजही धडपडतो आहोत. पुर्णत: गरीबी आजही हटली नाही.सुजलाम सुफलाम देश अजूनही घडावयाचा आहे.चार ऋतु,सर्व प्रकारचे हवामान, मुबलक पाणी असे असताना आपण जगातील प्रगत राष्ट्र असायला हवे.सत्तेचाळीसला आपण स्वातंत्र्य झालो.त्यादरम्यानच जपान बेचिराख झाला होता. आपली व जपानची तुलना केली तर ते आज कुठे?आपण कुठे?या कारणांचा शोध घेतला तर आपली दरीद्री मानसिकता व मतदान करण्याविषयीची मानसिकता हे उत्तर येत. इमारत भक्कम करायची असेल तर तिचा पायाही...